जळगाव । मोठ्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. यामुळे आता पाऊस कधी पुन्हा कमबॅक करेल असाल प्रश्न निर्माण झालाय. अशातच उत्तर महाराष्ट्रासाठी खूशखबर आहे.
हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, नांदेड, बीड, हिंगोलीमार्गे येणारा पाऊस उत्तर महाराष्ट्रात १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान येण्याचा अंदाज आहे. तसेच या कालावधीत ७० ते १३० मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात १०६.५ टक्के पाऊस झाला होता. आता ६५.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेला घाट माथ्यावर पाऊस होण्याचा, तर पूर्वेकडे कमी पाऊस होण्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. याशिवाय २८ ते २९ सप्टेंबदरम्यान परतीच्या पावसाच्या ढगांमुळे ३ ते ५ ऑक्टोबरपर्यंत वळीव स्वरूपात पाऊस होण्याची शक्यताही हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १२५.७ टक्के पाऊस झाला होता.















Discussion about this post