मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. आरबीआयने शुक्रवार, ६ जून रोजी रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली आहे. आता रेपो दर ५.५% पर्यंत खाली आला आहे, जो पूर्वी ६% होता. या वर्षी ही सलग तिसरी कपात आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्येही रेपो दरात कपात करण्यात आली होती.
याबाबतची माहिती आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. आरबीआयच्या या निर्णयामुळे तुमचे गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जाचे हप्ते कमी होणार आहेत. आरबीआयची सहा सदस्यांची टीम महागाई लक्ष्य साध्य करण्यासाठी पॉलिसी रेपो दरातील बदलांवर चर्चा करते. बैठकीच्या तिसऱ्या दिवशी चलनविषयक धोरणाबाबत निर्णय आणि माहिती दिली जाते.
आरबीआयने या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आधीच प्रमुख रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. सध्या रेपो दर ६% वर आहे. सलग दोन कपातींमध्ये तो ०.५०% ने कमी झाला होता. आता यावेळी ०.५० % कपात झाल्याने तो ६ % च्या खाली येईल. दुसरीकडे, जेव्हा रेपो रेट कमी होतो तेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळते, अशा परिस्थितीत बँका देखील त्यांच्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज देऊ लागतात.
रेपो रेट म्हणजे काय
तुम्ही बँकेकडून कर्ज घेता आणि ते निश्चित व्याजदराने परत करता, त्याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी आणि व्यावसायिक क्षेत्रातील बँकांना देखील त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. जेव्हा रेपो रेट कमी असतो तेव्हा सामान्य माणसाला दिलासा मिळतो आणि जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा सामान्य माणसांच्या कर्जाचे हप्ते वाढतात वाढतात.
Discussion about this post