मुंबई । टोलच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आज पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, यांच्या टोलदर कमी करण्याबाबतच्या वक्तव्यांचे व्हिडिओच दाखवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडिओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच टोलनाक्यावर यापुढे अडवलं तर टोल जाळून टाकू.. असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
तसेच यावेळी बोलताना राज ठाकरेंनी “टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्याच कंपन्यांना टोलचं कंत्राट कसं मिळतं ? असे सवाल उपस्थित करत नेते आपल्याला लुबाडतात, हे जनतेला कळत नाही का? टोल हा मोठा घोटाळा आहे, राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे..” अशी मागणीही त्यांनी केली.
Discussion about this post