मुंबई : गेल्या काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. यावेळी न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रियेला वेग आला आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाणार आहे. यावेळी पक्ष घटनेनुसार चालतो की नाही हे तपासलं जाणार आहे आणि त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार आता खरी शिवसेना कोणाची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरात लवकर घेऊ. निर्णय घेताना कुठलाही विलंब होणार नाही. घाई होणार नाही’ असे विधान केले होते. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Discussion about this post