मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाला मत चोरी प्रकरणात घेरले. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मत चोरांना संरक्षण देण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “मतचोरीच्या मुद्द्यावरून मी जे काही बोलत आहे ते मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. कारण मतदार यादीतून अनेक लोकांची नावे वगळण्यात आली आहेत.” असा आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातील राहुल गांधी म्हणाले, “सर्वप्रथम, हा हायड्रोजन बॉम्ब नाहीये खरा बॉम्ब अजून यायचा आहे. देशातील तरुणांना निवडणुकांमध्ये कसे धांधली होत आहे हे दाखवण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे.” ते पुढे म्हणाले, “मी ठोस पुराव्यांसह माझ्या विधानाचे समर्थन करत आहे. देशातील दलित आणि ओबीसी त्यांचे लक्ष्य आहेत. मला माझा देश आणि माझे संविधान आवडते आणि मी त्याचे रक्षण करेन.” राहुल यांनी दावा केला की कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते रद्द करण्यात आली”असा मोठा दावा यावेळी त्यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, “अलंद हा कर्नाटकातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथली ६,०१८ मते कोणीतरी डिलीट करण्याचा प्रयत्न केला. २०२३ च्या निवडणुकीत डिलीट झालेल्या एकूण मतांची संख्या आम्हाला माहित नाही, पण ती ६,०१८ पेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे. फक्त ही ६,०१८ मते डिलीट करताना, हे प्रकरण चुकून उघड झाले. एका बूथ-स्तरीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले की त्याच्या काकांचे मत डिलीट झाले आहे. त्याने त्याच्या काकांचे मत कोणी डिलीट केले याची चौकशी केली आणि ते शेजारी असल्याचे आढळले. जेव्हा त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘मी कोणतेही मत डिलीट केले नाही.’ याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीने डिलीट केले आहे त्याला किंवा ज्या व्यक्तीचे मत डिलीट केले आहे त्याला याबद्दल काहीही माहिती नव्हती. प्रत्यक्षात, दुसऱ्याच एका शक्तीने सिस्टम हायजॅक केली होती आणि ही मते डिलीट केली होती.”
तर विदर्भातील राजुरा विधानसभा मतदार संघात 6850 मतदारांची नाव जोडण्यात आली. त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याचे ते म्हणाले. कोणती तरी यंत्रणा, अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरून हा प्रकार करण्यात आल्याचा. त्यासाठी कॉल सेंटरचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, “भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त मत चोरांना संरक्षण देत आहेत. ते भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत. जेव्हा एखादी छोटीशी चूक देखील होते तेव्हा चोरी पकडली जाते.”















Discussion about this post