मुंबई । मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठं विधान केलं आहे. आंबेडकर यांनी मराठा आणि ओबसींच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे असले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. दोघांनाही एकत्र आरक्षण देऊ नये आणि दोघांनाही भिडवत ठेवू नये, असंही प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज वडीगोद्रीत जाऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते उपोषण करत असल्यामुळे आंबेडकर यांनी त्यांची विचारपूसही केली.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे ठेवले पाहिजे. मराठा आणि ओबीसींना एकमेकांसमोर भिडवत ठेवलं जात आहे. विधानसभेपर्यंत त्यांना भिडवत ठेवलं जाईल, अशी माझी धारणा आहे. कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर आरक्षण मिळाले पाहिजे. पक्षाची सत्ता यावी असं वाटत असेल तर सलोख्याची भाषा वापरली गेली पाहिजे, असं प्रकाश आंबडेकर म्हणाले.त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.















Discussion about this post