मुंबई । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्दे मांडले. ‘‘मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले; पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला ते गेले आहेत. दिल्लीत उत्तम रीतीने सरकार चालविले जात असताना, मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याच कारण काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. भाजपाला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, असंही ते म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणातून मूळ मुद्दे सोडून लोकांना इतर ठिकाणी वळवण्याचा काम करतात” असा शरद पवारानी नरेंद्र मोदींना टोला लगावला.
“इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला?” असा सवाल शरद पवारांनी विचारला. स्थानिक मुद्यावरुन भाषण सुरु करणं ही मोदींची स्टाईल आहे असं शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या FRP च्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. “FRP मुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर भाव मिळतो. FRP ही संकल्पना आम्ही सुरु केली. मोदींना हे माहित नाही. साताऱ्यात मोदींना यशवंतवराव चव्हाणांच्या नावाचा विसर पडला. स्थानिक नेते लिहून देतात, तेवढं मोदी बोलतात” अशी शरद पवार यांनी टीका केली.















Discussion about this post