१५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
जळगाव । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासनामार्फत उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून, त्या सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ अशी आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, समाज माध्यम पुरस्कार तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार या स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर पुरस्कार २०२५ या कॅलेंडर वर्षासाठी असून दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या साहित्य/वृत्तकथांसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ संदर्भातील माहितीपत्रक व अर्ज नमुने संबंधित कार्यालयात व शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच http://mahasamvad.in या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. इच्छुक पत्रकारांनी नियोजित मुदतीपूर्वी प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, (टप्पा क्रमांक ३), १ ला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, जळगाव – ४२५००१ येथे सादर कराव्यात, असे कळविण्यात आले आहे.















Discussion about this post