पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चोथ्याची वाडी मध्ये ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कालबाह्य झालेल्या बसचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता जव्हार – ऐना- मेढा ही बस जव्हार बस डेपोतून सुटली. या बसमधून ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. ही बस डेपोतून निघाली, मात्र चोथ्याच्या वाडी येथे येताच अचानक बंद झाली. यामुळे बस चालकाने बसचा सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बस कालबाह्य झालेली असल्याने या बसचे सर्वच यंत्रणाने कामे करणे बंद केले.
त्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूला असलेल्या दरीत कोसळली. या बसने तीन कोल्यांड्या खाल्याने बस मधील ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून या जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटिर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्वाचे म्हणजे जव्हार तालुका हा दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने या ठिकाणी सुसज्ज रस्ते नाहीत. त्यामुळे मोठ्या गाड्या चालवणे अवघड जाते. मात्र जव्हार बस डेपोत सगळ्या बस या कालबाह्य झालेल्या आहेत. या कालबाह्य झालेल्या बस चालवताना चालकांचा जीव मेटाकुटीला येतो. असे असताना बस महामंडळ हे प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.















Discussion about this post