मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला असून निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, बिपल्व बजोरिया यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली. ठाकरे गटाने तसं पत्रच विधीमंडळ सचिव जितेद्र भोळे दिले आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील अनागोंदी कारभारही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीकास्त्र सोडलं होतं.
या तिघांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
Discussion about this post