चाळीसगाव । येथील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात एन.एस.एस.चे महत्व विषद केले.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले कारण भविष्यातील खडतर जीवनात रासेयो माध्यमातून उचित असे मार्गदर्शन मिळते असे नमूद केले.
तसेच प्रमुख वक्ते म्हणून उप प्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे यांनी रासेयो स्थापनेपासून तर आज पर्यंत कश्या पद्धतीने रासेयोची कामगिरी असते याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजित बांधिलकी व जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रासेयो हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आर.एस.पाटील यांनी तर सूत्रसंचालन स्वयंसेविका क्रांती माळी आणि गायत्री मांडोळे यांनी केले.
यांची होती उपस्थिती
स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसरात उत्कृष्ट असे सामाजिक प्रबोधन करणारे पथनाट्य किरण निकम,नितीन शेवाळे,चेतन राठोड,संदीप बागुल, वासुदेव सोनवणे, यशवंत मोरे, रोहित देवरे, योगेश महाले,कृष्णा माळी यांनी सादर केले.कार्यक्रमात हर्शल शिंदे,किरण निकम,नितीन शेवाळे,चेतन राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.बी.बंस्वाल उपस्थित होते. प्रा.दीपक पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पृथ्वी पाटील,रघुनाथ खलाल,अविष्कार जाधव यांनी सहकार्य केले.
Discussion about this post