जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
मिरवणुकांच्या मार्गावर गर्दी होऊ नये आणि वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठा तसेच हरी विठ्ठल नगर आणि खंडेराव नगर येथील आठवडी बाजार तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मिरवणुकीदरम्यान रस्ते मोकळे राहून व्यवस्थापन सुलभ होणार आहे.
तसेच, हॉकर्स, विक्रेते आणि व्यावसायिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर अडथळे निर्माण होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बॅनर आणि झेंडे लावताना महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी विशेषतः वीज खांब आणि दूरध्वनी लाईनवर बॅनर्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे उपयुक्त पंकज गोरखो यांनी सांगितले.














Discussion about this post