मुंबई : आर्थिक नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणने वीज दरवाढीचा जोरदार शॉक दिला आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली असून कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागतं असून त्यातच शेतात पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. आता अशातच महावितरणने वीज दरात वाढ केली आहेत. या वीजदरवाढीमुळे वीजदरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल १० टक्क्यांपर्यंत आहे.
आयोगाने मागील वर्षी ‘महावितरण’च्या वीजदरवाढीला मंजुरी दिली होती. ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांकरिता आहे. त्यामुळे मागील वर्षी १ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात जवळपास तीन टक्के वीजदरवाढ करण्यात आली. आता २०२४ या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ सहा टक्के लागू करण्यात आली.
नवीन दर असे..
लघुदाब शेती पंपासाठी २०२२-२३ला ३.३० रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ ला हा दर ४.५६ रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्चदाब शेती पंपासाठी ४.२४ रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ साठी तो ६.३८ रुपये झाला आहे.















Discussion about this post