मुंबई । राज्याला परतीचा पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान आणखी काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवानाम खात्याने वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी तुफान पाऊस आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, पालघर, पुणे , रायगड, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर आज नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post