मुंबई । परतीला निघालेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची कोसळधार सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणखी जोर वाढला आहे. पुढील दोन-तीन दिवसात राज्याच्या काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. आज हवामान खात्यानं मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
तर २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण रायगड जिल्हा, तर पुणे जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे.















Discussion about this post