मुंबई । पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील १५,६३१ पोलिस आणि तुरुंग हवालदारांच्या भरतीचा शासन निर्णय बुधवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आला. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे १०० टक्के भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ही सर्व १५,६३१ पदं भरली जाणार आहेत.
विशेष सवलतीत, २०२२ आणि २०२३ मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल, असे सरकारी निर्णयात म्हटले आहे. पूर्वी, थेट भरतीद्वारे फक्त ५० टक्के पदे भरता येत होती, परंतु कर्मचाऱ्यांची तातडीची गरज लक्षात घेता ही मर्यादा रद्द करण्यात आली होती, असे या निर्णयात नमूद केलेले आहे. भरती प्रक्रिया विभागीय स्तरावर पार पाडली
जाईल आणि ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्निशन) आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४५० रुपये आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी ३५० रुपये असेल. तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस भरतीचा GR
पदांचा तपशील
१५,६३१ पदांमध्ये २०२४ मध्ये रिक्त झालेल्या आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा समावेश आहे. यात पोलिस कॉन्स्टेबलची १२, ३९९ पदे, २३४ पोलिस कॉन्स्टेबल चालक, २५ बँड्समन, २,३९३ सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल आणि ५८० तुरुंग कॉन्स्टेबल आहेत.















Discussion about this post