मुंबई । विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तोंडावरील या नाराजीनाट्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचेही पाहायला मिळत आहे.
फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीतच नाराजीनाट्य सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षप्रवेशामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांविरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आम्हाला जर अधिकार , निधी वाटप , अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपयोग काय असा सवाल शिंदेंच्या मंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाराजीनाट्यादरम्यान शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालायचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो असं म्हणून शिंदे बैठकीला गेल्याची माहिती मिळत आहे. भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे. ते त्याच पद्धतीने वागत आहेत अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सेना मंत्र्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री फडणवीस संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असं होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे अशा शब्दात फडणवीसांनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post