मुंबई । महायुती सरकारकडून अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबविली जात असून या योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जात आहे. दरम्यान मे महिन्याचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळाला नसून मात्र लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतले असल्याची बाब समोर आली आहेत. या योजनेत अडीच हजारपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. या महिलांवर आता कारवाई करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. दिलेले पैसे काढून घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. जसं आपण शोधतोय तसतसं अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार आपण काम करत आहोत.लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई करणार नाही. या योजनेत काही चुका झाल्या आहेत, अशीही कबुली त्यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, या निकषात न बसणारे अर्ज करणार नाहीत.मात्र, काही जणांनी अर्ज केले आणि लाभदेखील घेतला. दिलेले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्याची व्यवस्थित माहिती घेतली जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे, त्याच लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरु ठेवली जाणार आहे.
Discussion about this post