मुंबई । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या मागील कारण म्हणेजच खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता ३५३(२) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. यानंतर आत आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सण उत्सव काळात, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाचा निधी बंद, असे परिपत्रक महसूल वन विभागाने काढलेले नसताना देखील चुकीची माहिती देऊन शासनाची जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या विजय भाऊसाहेब काळुंखे या 27 वर्षीय तरुणाने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.















Discussion about this post