मुंबई । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 12 जिल्हा परिषदांचे तर पंचायत समितीच्या 125 पैकी 106 जिल्हा परिषदांचे कलही हाती आले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी लढत झाली होती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तब्बल 7 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात होते.
दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा परिषदांच्या 731 पैकी सुमारे 485 जागांचा कल स्पष्ट झाला आहे. या प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भाजप सुमारे 176 जागांवर पुढे आहे. शिंदे गटाची शिवसेना 109 जागांवर, तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी सुमारे 95 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रस सुमारे 40–42 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 25 जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 15 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. उर्वरित काही जागांवर अपक्ष व इतर पक्षांनी आघाडी घेतली आहे.
हे सर्व केवळ प्राथमिक कल असून अंतिम निकाल येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. मात्र पहिल्या फेऱ्यांमध्येच महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाल्याचं चित्र असल्याने राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा आता बदलणार आहे.
दुपारीपर्यंतची आकडेवारी-
भाजप- 176
शिवसेना शिंदे गट- 109
राष्ट्रवादी अजित पवार गट- 95
काँग्रेस- 40
शिवसेना ठाकरे गट- 25
राष्ट्रवादी शरद पवार गट- 15
इतर- 2















Discussion about this post