मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अखेर महाविकास आघाडीकडून तीनही पक्षांच्या सहीचं अधिकृत पत्र पाठवण्यात आलं आहे. बैठकीचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीचे पत्र आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देणारे पत्र पाठवलं.
ते पत्र पाठवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा फोन आला. कॉन्फरन्स कॉलवर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्याशी प्रकाश आंबेडकरांचे बोलणं करून दिलं, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
त्यावरती बोलताना रमेश चेनिथल्ला यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यासंदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन काँग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले आहेत”, अशी माहिती सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
“पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती त्यांनी केली. रमेश चेनीथल्ला यांची ही विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केली आहे, मात्र ती मान्य करतानाच प्रकाश आंबेडकरांनी रमेश चेनीथल्ला यांना महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल अवगत करून दिलं. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा बांधवांचा प्रश्न हा पेटलेला आहे. जरांगेचा आंदोलन असेल किंवा गरीब मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल यासंदर्भात रास्त आणि योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याच आंबेडकरांनी सांगितलं. रमेश चेनीथल्ला यांनी सुद्धा ते मान्य केलं, की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे”, असं सिद्धार्थ मोकेळे यांनी सांगितलं.
Discussion about this post