Saturday, August 9, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोबत राहू

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
February 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोबत राहू
बातमी शेअर करा..!

कवयित्री बहिणाबाई चौधरी  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित स्नेहसोबती मेळाव्यात उमटला आशयाचा सूर

जळगाव l विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाच्या हाकेला प्रतिसाद देऊन कायम विद्यापीठा सोबत राहू अशा आशयाचा सूर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित स्नेहसोबती मेळाव्यात उमटला. उपस्थितांनी विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या प्रकारच्या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला.

विद्यापीठाला आजपर्यंत सुवर्णपदक, विविध व्याख्यानमाला, शिष्यवृत्ती अथवा इतर उपक्रमांना ज्या संस्था अथवा व्यक्ती यांनी देणगी दिली आहे त्यांच्या या सकारात्मक कृतीबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ सोबती स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. सिनेट सभागृहात झालेल्या या मेळाव्यात उपस्थित सर्व प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या या पहिल्या प्रयोगाचे मन:पूर्वक स्वागत करुन भविष्यात विद्यापीठाच्या विविध उपक्रमांसाठी सोबत राहण्याचे आश्वस्थ केले. या समारंभास विद्यापीठ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ. के.बी.पाटील, व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचावर प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.

प्रारंभी प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रास्ताविकात या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी आपल्या भाषणात समाजाच्या सहभागाशिवाय भविष्यात शैक्षणिक संस्था टिकणार नाहीत कारण शिक्षणातून सरकार अंग काढून घेत आहे. भविष्यात हे प्रश्न गंभीर होऊ नयेय यासाठी आणि उत्तम शिक्षण मिळावे यासाठी समाजाच्या सहभागाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले.

अशोक जैन यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपासून जैन समुह विद्यापीठासोबत असल्याचे सांगून सध्या या समुहाकडून ११ सुर्वणपदके दिली जातात. त्या पदकांसाठी प्रारंभीच्या काळात दिलेल्या रकमेत वाढ केली जाईल व भविष्यात अजून काही मदत करण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र नन्नवरे यांनी समाजाने विद्यापीठाच्या पाठीशी एकदिलाने उभे राहण्याचे आवाहन केले. लवकरच फ्रेन्डस ऑफ युनिव्हर्सिटी ही कल्पना अंमलात आणली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी विद्यापीठ सोबती प्रतिनिधी या नात्याने प्राचार्य अनिल राव, जळगाव पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, ॲङ रवींद्र पाटील, डॉ. प्रिती अग्रवाल, प्राचार्य एस. एन. पटेल, संदीप काबरा, एच.बी. करनकाळ यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाने प्रथमच या प्रकारचा स्नेहमेळावा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करुन विद्यापीठाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व काही सूचना केल्या.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यापीठाला स्थापनेपासून सातत्याने मिळालेले उत्तम नेतृत्व, समर्पित सहकारी आणि समाजाचा सहभाग यामुळे विद्यापीठाचा विकास होत गेला. भविष्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील व वृषाली ललवाणी यांनी केले. सीए रवींद्र पाटील यांनी आभार मानले. विद्यापीठाने यापूर्वी सहा जणांना डी.लिट. पदवीने सन्मानित केले आहे. त्यांना त्यावेळी दिलेल्या मानपत्रांचे फ्रेमिंग विद्यापीठाच्या परीक्षा विभागात लावले जाणार आहे. त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या ६० पेक्षा अधिक विद्यापीठ सोबतींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यापीठाचा माहितीपट दाखविण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम; बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले

Next Post

पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक

Next Post
पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक

पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025

Recent News

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914