जळगाव | शहरातील कांचन नगर परिसरात मागील दीड वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. मक्तेदाराने केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. या समस्येच्या विरोधात कांचन नगर परिसरातील महिलांसह नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
आज, कांचन नगर मधील माजी नगरसेविका व नागरिक थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेऊन त्यांनी त्वरित रस्ता करण्याची मागणी केली. नागरिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरासाठी हा निधी मंजूर केला होता.
प्रभाग क्रमांक 2 अ मधील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु गेल्या एक-दीड वर्षापासून कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही, याबाबत नागरिकांनी ओरड केली. अभियंता प्रशांत सोनवणे यांनी नागरिकांना सांगितले की त्या रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे व ठेकेदारांचे 17 ते 18 कोटी रुपये बिल बाकी आहे, यामुळे अनेक ठेकेदारांनी कामे बंद केली आहेत. याबाबत संबंधित ठेकेदाराला फोन करून त्यांनी त्या तिथेच जाऊन संबंधित माजी नगरसेविकांसमोर ते कामाची पाहणी करून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.















Discussion about this post