जळगाव । महायुती सरकारला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे. लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांना पैसे मिळत नसल्याने नाराजी आहेत. अशातच लाडक्या बहिणींनी जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रात धडक दिली. या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरात लवकर द्यावेत, अशी भूमिका घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाखाहून अधिक महिला या लाडक्या बहीण योजनेस पात्र ठरल्या आहेत. मात्र, केवायसी केल्यानंतरही एक लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.यामुळे महिलांचा आज उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. केवायसी करताना झालेल्या चुकीमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं अधिकारी सांगत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.















Discussion about this post