जळगाव । महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 9 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी ५.८५ टक्के मतदान पार पडले आहेत..
सध्या मतदान करण्यासाठी हळूहळू नागरिक घराबाहेर पडत आहे. मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढू लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले नागरिक हैराण झाले आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे –
– अहमदनगर – ५.९१ टक्के
– अकोला – ६.० टक्के
– अमरावती – ६.६ टक्के
– औरंगाबाद – ७.५ टक्के
– बीड – ६.८८ टक्के
– भंडारा – ६.२१ टक्के
– बुलढाणा – ६.१६ टक्के
– चंद्रपूर-८.५ टक्के
– धुळे – ६.७९ टक्के,
– गडचिरोली – १२.३३ टक्के
– गोंदिया -७.९४ टक्के
– हिंगोली -६.४५ टक्के
– जळगाव – ५.८५ टक्के
– जालना- ७.५१ टक्के
– कोल्हापूर-७.३८ टक्के
– लातूर ५.९१ टक्के
– मुंबई शहर-६.२५ टक्के
– मुंबई उपनगर-७.८८ टक्के
– नागपूर -६.८६ टक्के
– नांदेड -५.४२ टक्के
– नंदुरबार-७.७६ टक्के
– नाशिक – ६.८९ टक्के
– उस्मानाबाद- ४.८५ टक्के
– पालघर-७.३० टक्के
– परभणी-६.५९ टक्के
– पुणे – ५.५३ टक्के
– रायगड – ७.५५ टक्के
– रत्नागिरी-९.३० टक्के
– सांगली – ६.१४ टक्के
– सातारा – ५.१४ टक्के
– सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के
– सोलापूर – ५.७ टक्के
– ठाणे ६.६६ टक्के
– वर्धा – ५.९३ टक्के
– वाशिम – ५.३३ टक्के
– यवतमाळ – ७.१७ टक्के
Discussion about this post