जळगाव | जामनेर तालुक्यात झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच जळगाव शहरात पुन्हा एका खुणाची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. तर सोबत इतर दोन जण जखमी झाले असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अरुण बळीराम सोनवणे (वय-२८, रा. समता नगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर सोबत त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
जळगाव शहरातील समता नगर परिसरात जुन्या वादातून आज सकाळी काही तरुणांसोबत मयत अरुण याच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता, परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने काही मारेकऱ्यांनी मयत अरुण बळीराम सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे एकट्याला बोलवले.
दरम्यान अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तिथे धावत गेला. तोवर इतर मारेकऱ्यांनी त्याच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. असता अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.















Discussion about this post