जळगाव । देशासह राज्यात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यादरम्यान जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावमधील रामगदेववाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन बालकांसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७), सर्व रा. रामदेववाडी, जळगाव असे मयत आई व मुलांचे नाव आहे.
अपघातानंतर रामदेववाडी गावातील गावकऱ्यांचा संताप व्यक्त केला आहे. दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांचा जागीच मृत्यू झालाय. मयत चारही जण हे एकच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समजत आहे.
ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. संतप्त जमावाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आलिशान कारच्या धडक नंतर दुचाकी पूर्ण चक्काचूर झाला आहे.
Discussion about this post