नवी दिल्ली । केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात केलेल्या बदलामुळे अनेक नियम पाळावे लागतात. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास दंड होईल, अशी कोणतीही अट मोटर वाहन कायद्यात नाही. असा कोणताही नियम कायद्यात नाही. त्यामुळेच चप्पल अथवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास चालान कापले जात नाही, म्हणजेच दंड होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. चप्पल घालणं, अर्ध्या बाह्यांच शर्ट, लुंगी -बनियान घालून बाईक चालवणं,गाडीचा आरसा खराब असणं अथवा गाडीत एक्स्ट्रॉ बल्ब नसणं अशा गोष्टींमुळे चालान कापला जात नाही. अफवांपासून सावध रहावे, असे या पोस्टवर लिहीण्यात आले होते.
बूट घालून गाडी चालवण्याचे फायदे
जर तुम्ही बूट घालून गाडी तालवत असाल तर ब्रेक पॅडलवर चांगली ग्रिप (पकड) मिळते. पण चप्पल घातल्यास ती पकड मिळू शकत नाही. बऱ्याच वेला चप्पल पायतून घसरूनही शकते,त्यामुळे दुर्घटना, अपघात होण्याची शक्यता वाढते.















Discussion about this post