रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी पश्चिम रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती कक्षाने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण २८६५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
भरतीत सामान्य प्रवर्गासाठी ११५०, अनुसूचित जातीसाठी ४३३, अनुसूचित जमातीसाठी २१५, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ७७८ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २८९ पदांचा समावेश आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या तारखेपर्यंत किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे.
नियमांनुसार प्रवर्गांना वयोमयदित आरक्षित सवलत मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींना ५ वर्षे, ओबीसींना ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षे सूट दिली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवाराने किमान ५० टक्के गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (आयटीआय) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत सादर करावे, अशी माहिती प्रशासनाने दिली















Discussion about this post