जळगाव । रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी असून मध्य रेल्वेने भुसावळ – मुंबई सेंट्रल विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. या गाडीच्या वेळेत व रचनेत काहीही बदल झालेला नाही. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले,
भुसावळ येवून सुटणारी गाडी (१०५२) भुसाकळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही दि. २८ फेब्रुवारीपर्यंत होती, त्यात आता बाद केली आहे. ही गाडी आता १ मे पर्यंत चालवली जाणार आहे. तर गाडी (०९०५१) मुंबई सेंट्रल- भुसावळ प्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही २७ फेब्रुवारीपर्यंत होती. त्यात वाढ केली असून ही गाडी आता ३० एप्रिलपर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे.















Discussion about this post