पुणे । माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) शिक्षकांच्या मानधनात अखेर वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर ही वाढ झाली आहे.
उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी पूर्वीचा दर प्रतितास १५० रुपये होता. तो आता ३०० रुपये इतका करण्यात आला. तर माध्यमिक शिक्षकांचा पूर्वीचा दर १२० रुपये होता. तो आता २५० रुपये करण्यात आला. राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अहंताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येते.
त्यांना घड्याळी तासिकेनुसार अर्थात सीएचबीनुसार मानधन देण्यात येते. सीएचबी शिक्षकांनी मानधनात वाढ व्हावी यासाठी वारंवार आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.















Discussion about this post