पुणे । राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या २० दिवासापासून पावसाने दडी मारली असून यामुळे शेतकरी वर्ग संकटात आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पिके बहरू लागली होती. मात्र पावसाअभावी पिके धोक्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यात झाला असून पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
त्यानुसार आता या महिन्यात पाऊस नसणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.
काय आहे हवामान विभागाचा सल्ला
राज्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑगस्ट महिन्याचा फक्त एक आठवडा राहिला आहे. या एका आठवड्यातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव दिसून येत आहे. यामुळे सध्या राज्यात पाऊस नाही. यापूर्वी भारतात २००४, २००९, २०१४ आणि २०१८ मध्ये अल निनोचा प्रभाव होता. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता. यंदा अल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजून पाऊस काही दिवसांनी होणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार आहे. यामुळे पुढील १० दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Discussion about this post