मुंबई । राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या या मतदानाचा निकाल काल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. त्यात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे सर्वात जास्त नगराध्यक्ष निवडून आले.
राज्यात २८८ जागांपैकी महायुतीचे २२४ नगराध्यक्ष निवडून आले. तर महाविकास आघाडीला ५१ नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले. यामध्ये एकट्या भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले. त्यांनी १२९ नगरपरिषदा आणि नगरपंचायत पंचायत जिंकल्या. भाजपच्या नगरसेवकांचा आकडा ३३०२ वर गेला आहे. या निवडणुकीमध्ये फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील लॉटरी लागली. भाजप नंबर वनचा पक्ष ठरला जरी असला तरी शिवसेना शिंदे गटाचे ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ५१ नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजे ३४ नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी हार मानावी लागली.
नगरपरिषद- नगरपंचायतीमध्ये कोणत्या पक्षांचा किती जागांवर विजय?
भाजप – १२९
शिवसेना शिंदे गट – ५१
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३३
काँग्रेस – ३५
शिवसेना – ८
राष्ट्रवादी – ८
स्थानिक आघाडी – २४
कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष झाले?
भाजप – १२०
शिवसेना शिंदे गट – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३६
काँग्रेस – ३४
शिवसेना – ९
राष्ट्रवादी – ८
स्थानिक आघाडी – २५
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक विजयी झाले?
भाजप- ३३२५
शिवसेना शिंदे गट – ८२६
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ४११
शिवसेना ठाकरे गट – १७०
काँग्रेस – १६१
राष्ट्रवादी – १४८
स्थानिक आघाडी – १९०















Discussion about this post