मुंबई । मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली होती. या ठिकाणी ते आमरण उपोषण करणार असून यासाठी राज्यभरातील सर्व आंदोलकांना आझाद मैदानात येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने आपला हा निर्णय जाहीर केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सव काळात हे आंदोलन करण्यात येणार असल्याने या विरोधात जनहित याचिका करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
यावेळी हायकोर्टाने सांगितले की, मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे हे अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करू शकत नाहीत. यासाठी कोर्टाने त्यांना गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दाखला दिला.
यावेळी मुंबई हायकोर्टाकडून जरांगे यांच्या आंदोलनासाठी पर्यायी मार्ग निवडण्याचा देखील सुचवले आहे. याबाबत मुंबई हायकोर्टाने पुढे सांगितले की, ‘मुंबईत सार्वजनिक जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून मनोज जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर येथे शांततापूर्ण निषेधासाठी पर्यायी जागा द्यायची की नाही हे सरकार ठरवू शकते. सार्वजनिक सभा आणि आंदोलनासाठी नवीन नियमांनुसार परवानगी मिळाल्यानंतर शांततापूर्ण निषेध करता येतात. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत















Discussion about this post