मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली असून आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. थंडीचा हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे.
अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाबक्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. पुणे शहरात सकाळच्या धुक्यातही वाढ झाली आहे. पुण्यात ही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४. ९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोदिंयाचे तापमान ९ अंश सेल्सियस होते. मुंबईतील तापमान २३.२ अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान १०.६ तर नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.
Discussion about this post