नवी दिल्ली : गुढी पाडवाच्या दोन दिवसआधीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड बातमी दिली आहे.केंद्र सरकारच्या पेन्शनधारक अन् कर्मचाऱ्यांचा भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ झाल्यांनतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन 55 टक्के झाला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ यापूर्वी जुलै 2024 मध्ये झाली होती. तेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात आला होता. तेव्हा तीन टक्के वाढ झाली होती. आता दोन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात टक्के टक्के अधिक महागाई भत्ता जोडला जाईल. ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी मानली जाईल. महागाई भत्त्याच्या वाढीमुळे करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल.
Discussion about this post