धुळे । शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि तपासणीत आढळलेल्या गंभीर अनियमिततांमुळे धुळ्यातील तब्बल ३२ कृषी सेव केंद्रांचे खत विक्री परवाने जिल्हा कृषी अधीक्षक सूरज अनिल जगताप यांनी एका महिन्यासाठी निलंबित केले आहेत.
यात, शिरपूर तालुका १२, साक्री तालुक्यातील ७, शिंदखेडा तालुक्यातील ६. धुळे तालुक्यातील ५ केंद्रांचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील २ कृषी केंद्रांचे परवाने कायम स्वरुपी रद्द करण्यात आले आहे.
या कृषी सेवा केंद्रांनी खत विक्री करताना अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात प्रामुख्याने, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र समाविष्ट नसणे, रासायनिक खतांच्या विक्रीचा मासिक अहवाल वेळेवर सादर न करणे, तसेच ई-पॉस मशीनमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे यांसारख्या गंभीर अनियमिततांचा समावेश आहे. काही केंद्रांनी युरिया खत उपलब्ध असतानाही ‘साठा शिल्लक नाही’ असा फलक लावला होता, तर काही ठिकाणी साठा आणि भावफलक अद्ययावत नसल्याचेही आढळले. एका प्रकरणात, युरिया खताची इतर खतांबरोबर लिंकिंग केल्याचेही दिसून आले.
यांचे परवाने रद्द
गोपाल अॅग्रो एजन्सी, याहामोगी कृषी सेवा केंद्र, लाकड्या हनुमान, शुभम कृषी सेवा केंद्र, दुरवड्या, गौरव कृषी सेवा केंद्र, खामखेडा, श्रीपाद कृषी केंद्र, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूर, मेहुल कृषी सेवा केंद्र, वरुळ, चिराईदेवी किसान बाजार, अर्थे, जय मल्हार अॅग्रो एजन्सी अशा नऊ केंद्रांचे परवाने रद्द केले आहे.















Discussion about this post