मुंबई । निवडणुकीनंतर आता राज्यात महायुती सरकार सत्तेत आलं असून मंत्र्यांचं खातेवतोही झालेय.दरम्यान, निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं.मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय.
याच दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण आहे.
भाषणादरम्यान समोर बसलेल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?.. मी जेवढी भाषणं केली…तुला एक माहिती आहे का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात… राज्याचा गाडा आपल्याकडे आहे. आपण दोघं नंतर बसू… तुला मी माझी परिस्थिती सांगतो…मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही”.















Discussion about this post