मुंबई । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत आहे. असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले आहे.
‘बाबा अगदी ठीक आहेत. त्यांच्या निधनासंदर्भातील बातम्या बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. कृपया अशा अफवा पसरवू नका’, असं ईशा देओल हिनं सांगितलं. दरम्यान, धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी विविध तर्क-वितर्कांना लढवले जात आहे. मात्र, आता कुटुंबाने स्वतः पुढे येऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
सोशल मीडियावर अफवांचा पूर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होती. अनेकांनी श्रद्धांजली पोस्टसुद्धा शेअर केल्या होत्या. पण कुटुंबाने स्पष्ट केले की धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील. धर्मेंद्र यांचे चाहते देशभरात आहेत आणि त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. ईशा देओलच्या अपडेटनंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र, नंतर त्याची प्रकृती खालावत गेली. त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वा वाढदिवस आहे. याआधी, यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांच्यावर डोळ्यांवर ग्राफ्ट ऑपरेशन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी सन 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘अनुपमा’, ‘आया सावन झूम के’ अशा चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाची उठावदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.















Discussion about this post