मुंबई । अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये. अशातच या पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला.पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या आता या नव्यानं गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हे गौप्यस्फोट केला. त्यावेळी सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या असं फडणवीस यांनी सांगितलं.
शरद पवारांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी आमचा वापर केला. रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनीच केलं, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
Discussion about this post