Tuesday, August 5, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
July 1, 2023
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी -जिल्हाधिकारी अमन मित्तल
बातमी शेअर करा..!

जळगाव | शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे. असा विश्वास जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केला.

कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. मित्तल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी श्री. जगताप यांच्यासह इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्वाधिक योजना या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांसोबत राहील. शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरत उत्पादन वाढ, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण या बाबीवर विशेष जोर दिला पाहिजे. शेती क्षेत्रात दिवसेंदिवस अनेक अमुलाग्र बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करून शेती अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि शेतकरी यांनी हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवता येतील त्यासाठी शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. गट शेती ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असून कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शेतकऱ्यांनी चौकटीच्या बाहेर विचार केला पाहिजे. शेतकरी आपल्या शेतात पिकवत असलेला माल प्रक्रिया करून बाजारात पोहोचल्यास शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक हातभार लागू शकतो. यासाठी लवकरच प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी यांची चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केले जाईल, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला. हवामानातील बदल, शेती क्षेत्राशी बदलत्या विविध बाबी शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर घरी बसल्या ही माहिती मिळावी यासाठी मोबाईल वरच सर्व डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. यासाठी विविध कंपन्याशी चर्चा देखील सुरू असून लवकरात लवकर हा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आपल्या मनोगत म्हणाले की, शहरीकरण कितीही मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झाले तरी देखील आजही देशाचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.  निव्वळ शेतीवरच शेतकऱ्यांनी अवलंबून न  राहता प्रक्रिया उद्योगावर भर देणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही उत्पादनांना प्रक्रिया उद्योगात फार मोठी संधी आहे. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचे दुष्परिणाम ओळखून रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. मात्र त्याचे दुष्परिणाम देखील फार मोठे आहेत. शेतकरी आणि प्रशासनाने ठरविले तर  मदत होऊ शकते असा विश्वास देखील डॉ आशिया यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कापूस संशोधन केंद्राचे कापूस पैदासकार डॉ.गिरीश चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत बाहेती यांनी कापूस या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बुलढाणा येथे झालेल्या भीषण अपघातातील मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी संशोधन केंद्र ममुराबाद यांनी विकसित केलेल्या निंबोळी अर्काचे विमोचन देखील यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत विहिरीच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेशाचे वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यासोबतच राशी सीड्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ममुराबाद येथील शेतकरी एन डी पाटील व आसोदा येथील शेतकरी  यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोगतातून शेतकऱ्यांनी शेती करताना येणाऱ्या अडीअडचणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडल्या. या सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासनस्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी अशी करावी तक्रार

Next Post

राज्यात काही ठिकाणी यलो अन् काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट : जळगाव जिल्ह्यात कशी आहे परिस्थिती?

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील जळगावसह ९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

राज्यात काही ठिकाणी यलो अन् काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट : जळगाव जिल्ह्यात कशी आहे परिस्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

August 5, 2025
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी! 367 पदांवर भरती

August 5, 2025
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना मोठा झटका! सोने दरात पुन्हा मोठी वाढ, आताचे दर तपासून घ्या

August 5, 2025
जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

August 5, 2025

Recent News

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

मोठी बातमी! जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

August 5, 2025
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी! 367 पदांवर भरती

August 5, 2025
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना मोठा झटका! सोने दरात पुन्हा मोठी वाढ, आताचे दर तपासून घ्या

August 5, 2025
जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

August 5, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914