जळगाव । मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केला. यावेळी केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार सोन्यावरील सीमा शुल्क 6 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. यानंतर जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात मोठी घसरण झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर जळगावच्या बाजारात सोन्यात 2 हजार 500 रुपयाची घसरण झाली आहे. काल जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे 73 हजार 300 इतके होते. मात्र आज सोन्याचे भाव 70 हजार 500 इतके झाले आहेत. भाव कमी झाल्यामुळे आम्ही जादा सोन खरेदी करू शकतो अश्या भावना ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत















Discussion about this post