मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली असून राज्यभरातून एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासनाकडून परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तयारी केली गेली आहे. कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी भरारी पथके आणि काही केंद्रांवर सीसीटीव्ही प्रणालीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. शिक्षण मंडळाने आधीच स्पष्ट केले आहे की, कॉपी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
त्याचबरोबर, Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावी परीक्षेबद्दल एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बोर्डाने स्पष्ट केले आहे की, पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी मिळेल. बोर्डाने कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर कठोर नियम आहेत; त्यांना परीक्षेला हजर राहणे अनिवार्य आहे आणि पळवाट किंवा सुट्टीसारख्या पर्यायांची कोणतीही सवलत नाही.















Discussion about this post