मुंबई | मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी काल 25 एप्रिल रोजी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता महायुती देखील उमेदवाराची घोषणा करण्याच्या तयारी करत आहे. उत्तर मध्य मुंबईसाठी महायुतीच्या भाजपने अद्याप तरी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आता भाजप येथे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांची भाजपसोबत चर्चा झाल्याचे देखील म्हंटले जात आहे.
या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून मौन बाळगण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपनं मुंबईत तीन जागा जिंकल्या. यातील दोन जागांवर भाजपनं उमेदवार दिले आहेत. त्यानंतर भाजप येथे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांची भाजपसोबत चर्चा झाल्याचे देखील म्हंटले जात आहे.
उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत, त्यांची लोकप्रियता मोठी आहे. यामुळे भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. येथे शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी दोन आमदार असून ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.
उज्ज्वल निकम मूळचे जळगावचे असून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. मुंबईत १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट, २६/११ चा दहशतवादी हल्ला हे महत्त्वाचे खटले निकम यांनी हाताळले आहेत. याशिवाय इतरही अनेक मोठे खटले त्यांनी हाताळले आहेत. तर काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. त्यानंतर आता त्यांना लोकसभेसाठी संधी देण्यात आली आहे.















Discussion about this post