नाशिक । केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण होता दिसत होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी आक्रमक झाली आहे. मात्र अशातच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सरकारकडून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असं फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट
राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटलं की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमि शाह तसेच केंद्रीय मंत्रीपियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.















Discussion about this post