भुसावळ । प्रेमविवाह करून आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रेमी युगुलांने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना भुसावळ शहरात घडली असून या घटनेनं सर्वात्र खळबळ उडाली आहे .
शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाहबद्ध होणार होते.
शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशनकेल्याने तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. काजलच्या मृत्यू झाल्याचे कळताच कुणाल मनोज भालेराव याने तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post