भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उडविले. या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाले आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला २४ तासात आणखी एक हादरा बसलाय.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या १४ सैनिकांना आयईडी हल्ल्यात उडवलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानसमोरील अंतर्गत संकट अधिक गडद झालं आहे. बलुच आर्मीने पाकिस्तान आणि चीन या दोघांना इशारा दिलाय. बलुचिस्थान सोडा, अन्यथा आणखी असेच मोठे हल्ले होतील. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
#BREAKING: Baloch Liberation Army’s Special Tactical Operations Squad (STOS) targeted a Pakistan Army vehicle in a remote controlled IED attack in Mach Kund Area of Bolan, while they were preparing military operation. 12 Pakistan Army soldiers neutralised by BLA. pic.twitter.com/2nd3Z9mo9D
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 7, 2025हे हल्ले बोलन आणि केच जिल्ह्यांत झाले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली. बीएलएच्या विशेष टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलनमधील माच परिसरात रिमोट-नियंत्रित आयईडीद्वारे लष्करी ताफ्यावर हल्ला केला. यात विशेष ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सूबेदार उमर फारूक यांच्यासह १२ सैनिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात केचमधील कुलाग तिग्रान येथे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडवर आयईडी हल्ला झाला, ज्यात दोन सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.















Discussion about this post