जळगाव । गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.
दरम्यान, दोन तीन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील सुनगाव, जामोद, उसरा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वादळी वारा आणि गारपीटीने या दोन्ही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास मातीत मिसळल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
त्याचप्रमाणे संग्रामपूर तालुक्यातील वानखेड, वरवट बकाल, एकलारा, सोनाळा टूनकी या भागातील नागरिकांचं अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे.
दरम्यान काँग्रेसच्या पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी जामोद परीसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. जळगाव जामोदच्या तहसीलदार शितल सोलाट व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळं बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे.















Discussion about this post