जळगाव : जिल्ह्यातील 18 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे. नगरसेवक पदासाठी दाखल 4077 अर्जांपैकी 945 अर्ज बाद झाले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी दाखल 242 अर्जांपैकी 68 अर्ज अवैध ठरले आहेत.
छाननीनंतर आता माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी आणि मतविभाजन रोखण्यासाठी पक्षांचे नेते कशी मनधरणी करतात याकडे सर्वांचा कटाक्ष आहे. अनेक ठिकाणी अपक्ष मैदानात राहिल्यास मतांची विभागणी होऊ शकते, त्यामुळे पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना रंग
निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू असून सर्वत्र राजकीय गणिते तापू लागली आहेत. प्रचार सुरू असताना कोण माघार घेणार, कोण टिकणार आणि कोणाच्या माघारीचा फायदा कोणाला होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post