जळगाव । जळगाव महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. यामध्ये भाजप शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येतेय. मविआला अवघ्या मोजक्याच जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान शहरातील एका प्रभागातशिवसेना ठाकरे गटाचे गटाचे सर्व चार उमेदवार विजयी झाले आहेत.
जळगाव शहर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये ठाकरे गटाचे चारही उमेदवार हे विजयी झाले. त्यात अक्षय वंजारी,इब्राहिम पटेल,जरीनाबी शब्बीर शहा ,हीनाबी शाकीर खान हे विजयी झाले असून प्रभाग क्रमांक ६ मधून देखील उबाठा गटाच्या अर्शिन खाटीक यांनी विजय मिळविला आहे.
प्रभाग क्रमांक ६ अ च्या उमेदवार अर्शीन खाटीक यांनी भाजपच्या जयश्री धांडे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या हेतल महेंद्र यांचा पराभव केला आहे. मात्र अवघ्या ९४ मतांच्या आघाडीने अर्शिन खाटीक यांचा विजय झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.















Discussion about this post